मकर संक्रांती ( makar sankranti) हा भारतीय संस्कृतीतील हिंदू धर्मामधील एक महत्वाचा आणि शुभ सण आहे. नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्यात १४ किंवा १५ तारखेला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या सणाला मकरसंक्रांत किंवा मकर संक्रमण असे म्हणतात. सूर्याचे संक्रमण टिळक पंचांगाप्रमाणे १० जानेवारीला होते तर श्रीदाते पंचांग प्रमाणे १४ किंवा १५ जानेवारीला होते.
या दिवशी भगवान सूर्यदेव आपला पुत्र शनीच्या घरात म्हणजेच मकर राशीत प्रवेश करतात. सूर्याच्या या प्रवेशामुळे उत्तरायण सुरू होते, म्हणजे दिवस हा हळूहळू मोठा होतो आणि प्रकाशमानतेत वाढ होते.
याच दिवशी गंगामाई भागीरथाच्या मागे पृथ्वीवर अवतरली होती, असेही एक मान्यता आहे. म्हणूनच या दिवशी पवित्र नदीत स्नान, दान-धर्म, आणि सूर्यपूजनाचे विशेष महत्त्व आहे.
शंकासुर व किंकरासूर या राक्षसांचा वध
भोगी, संक्रांत आणि किंक्रांत (करीदिन) हे तीन वेगवेगळे दिवस असतात त्यामुळे या तीन दिवशी संक्रांत साजरी केली जाते. संक्रांत हे एक देवी स्वरूप असल्याने संक्रांतीने शंकासुर व किंक्रांतीने दुसऱ्या दिवशी किंकरासूर या दोघांचा वध केल्याने हा सन साजरा केला जातो अशी पुराण कथा आहे. देवी तिच्या नेहेमीच्या रूपाप्रमाणे प्रसन्न व मंगलदायक दिसत नसून लांब होठ दीर्घ नाक एक तोंड नऊ बाहू असे तिचे स्वरूप असते. दरवर्षी तिचे वाहन अस्र, वस्त्र, शस्त्र ,अवस्था, अलंकार वेगवेगळे असते. आपले अलंकार व वस्त्र यातून संक्रांत भविष्यकाळ सुचवीत असते.
संक्रांत ज्या दिशेने येते तिकडे समृद्ध आणि जिकडे जाते तिकडे संकट येते अशी भावना आहे. संक्रातीच्या दिवशी पितरांची पूजा करावी कारण तो एक योग्य श्राद्ध दिवस असतो. तसेच त्या दिवशी तिळाचे व उदकाचे दान करावे.
या सणाला स्नानाच्या वेळेस त्वचेला तिळाची पेस्ट लावावी व पाण्यात तीळ टाकून स्नान करावे. उष्ण व लोहतत्व असलेला गुळ तिळासोबत आणि बाजरीच्या भाकरीवर तीळ टाकून खातात. कोकणात या दिवशी इडली व नारळाचे दूध करतात. देशामध्ये गुळाची पोळी व तूप खातात तसेच उत्तरेत या सणाला खिचडीसंक्रांत असे नाव आहे कारण उत्तरेत लोक मुगडाळ व तांदूळ यांची खिचडी करून खातात.
संक्रांतीचे विज्ञानिकदृष्ट्य महत्व
संक्रांती म्हणजेच संक्रमण आणि संक्रमण याचा अर्थ असा होतो की क्रमन करून जाणे. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. पौष महिन्यातील मकर संक्रमण हे उत्तरायणाचा आरंभ करते ( म्हणजेच सूर्य उत्तर दिशेला सरकतो). उत्तरायणमध्ये दिवस हळूहळू मोठा होत जातो. तर आषाढातले कर्क संक्रमण हे दक्षिणायणाचा ( म्हणजेच सूर्य दक्षिणेला सरकतो) आरंभ करते. दक्षिणायणामध्ये दिवस हळूहळू छोटा होत जातो. सूर्याच्या या क्रमन करण्याच्या भासमानाला क्रांतीवृत्त असे देखील म्हणतात.
संक्रांतीच्या दिवशी सुगडं पूजने
संक्रांतीच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये सुगडं पुजण्याची प्रथा आहे. या सुगड्यामध्ये पाच खण आणले जातात ( मातीचे छोटे भांडे) या खनाला हळदी – कुंकवाचे पाच बोटे लावले जातात. त्यानंतर या खणाच्या गळ्याभोवती पांढरा दोरा सुतवला जातो ( गुंडाळला जातो). खनाच्या आत मध्ये हरभरा, गव्हाची ओंबी, बिब्याची फुले, उसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, गाजर, तीळ, ज्वारीचे कणीस इत्यादी वस्तू टाकल्या जातात व त्याची दिवा, धूप आणि अगरबत्ती लावून पूजा केली जाते. त्यानंतर सर्व सुवासिनी गोळा होऊन हे सुगडं पदरामध्ये झाकून एकमेकींना हळदी – कुंकू लावून हे सुगडं दान देतात. संक्रांतीनंतर रथसप्तमी पर्यंत हळदी – कुंकवाचा कार्यक्रम महिलांमध्ये सुरू होतो.
तिळगुळाचे महत्व – “तिळगुळ घ्या, गोडगोड बोला”
या दिवशी तिळगुळ वाटणे आणि खाणे ही खास परंपरा आहे. यामागे शास्त्रीय आणि सामाजिक दोन्ही महत्त्व आहे. तीळ आरोग्यवर्धक आहे – हिवाळ्यात शरीरात उष्णता निर्माण करतो. गूळ पचनास मदत करणारा आणि रक्तशुद्ध करणारा आहे.
तिळगूळ वाटताना प्रेम, गोडवा आणि मैत्री वाढवण्याचा संदेश दिला जातो व म्हणतात “तिळगुळ घ्या, गोडगोड बोला”.
मकरसंक्रांतीला काय करतात?
- संक्रांतीला पतंग उडवण्याची परंपरा आहे. विशेषतः गुजरातमध्ये व महाराष्ट्रातील येवला या शहरांमधे मोठ्या प्रमाणात पतंग उडवले जातात.
- संक्रांतीला महिला एक दुसरीला हळदीकुंकू देतात व वाण ( सौभाग्यवस्तू) वाटतात.
- लहान मुलांना हलव्याचे दागिनं घालण्याची प्रथा आहे.
मकर संक्रांतीसाठी काळी साडी का वापरतात?
मकर संक्रांतीच्या वेळी काळ्या साड्या नेसणे ही भारताच्या काही भागात, विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटक सारख्या राज्यांमध्ये परंपरा आहे. काळ्या रंगाची निवड बहुतेक वेळा हिवाळ्याच्या हंगामाशी आणि कापणीच्या कालावधीच्या समाप्तीशी संबंधित असते. या सणादरम्यान काळा रंग शुभ मानला जातो कारण तो अंधाराचा अंत आणि अधिक सूर्यप्रकाशासह मोठ्या दिवसाच्या प्रारंभाचे प्रतीक आहे.
हे लक्षात घेणे आवश्यक आहे की भारतातील विविध प्रदेश आणि समुदायांमध्ये प्रथा आणि परंपरा भिन्न असू शकतात, म्हणून मकर संक्रांतीच्या वेळी काळी साडी परिधान करण्याचे महत्त्व सणाच्या सर्व उत्सवांना सार्वत्रिकपणे लागू होऊ शकत नाही.
हे सुद्धा वाचा;-
- ऋषी पंचमी माहिती | ऋषी पंचमी कशी साजरी करावी?
- छत्रपती शिवाजी महाराज – जन्म, मृत्यू, पत्नी आणि इतिहासाबद्दल काही माहिती
- दीप अमावस्या किंवा आषाढी अमावस्या साजरी करण्याची योग्य पद्धत
- नवरात्री : नवरात्री कथा, आदिशक्तीची निर्मिती का आणि कशी झाली? दुर्गा देवीची संपूर्ण रूपे, नावे आणि त्यांचे महत्व.
- श्री हनुमान जयंती / अंजनेय यांच्याबद्दल संपूर्ण माहिती
- श्री रामांना मर्यादापुरुषोत्तम असे म्हणतात? आणि रामायणातील काही गुड रहस्यांबद्दल माहिती.
- गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमेबद्दल संपूर्ण माहिती व कथा
- आपण गणेश उत्सव का साजरा करतो? | गणपती का बसवतात?
- श्रीकृष्णजन्माष्टमीची कथा, माहिती, इतिहास
- हरतालिकेचे महत्व काय?
- स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज ( छावा ) – एक पराक्रमी निडर योद्धा
- भारतीय सिल्क साडी बद्दल संपूर्ण माहिती आणि प्रकार
- पुरुषांसाठी आणि नवरदेवासाठी कॉमेडी मराठी उखाणे
- बैलपोळा का साजरा केला जातो? जाणून घ्या कथा आणि संपूर्ण माहिती
- पैठणी साडी चे प्रकार, कलर आणि इतिहासाबद्दल संपूर्ण माहिती
- आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी बद्दल संपूर्ण माहिती