बैलपोळा हा भारतीय संस्कृतीमधील शेतकऱ्यांसाठी विशेष महत्वाचा सण आहे. शेतकऱ्याच्या कष्टामधील खरा साथीदार म्हणजे त्याचे बैलं. बैल हा मुक प्राणी असूनही त्याला त्याच्या मालकाबद्दल खूप प्रेम असते आणि त्याच्या मालकाचेही म्हणजे शेतकऱ्याचे देखील त्याच्यावर खूप प्रेम असते. बैल आणि शेतकऱ्यांमधील अनेक सुंदर जिव्हाळ्याचे उदाहरनं आपल्याला बघायला भेटतात.
पोळा किंवा बैलपोळा हा सण श्रावणाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे श्रावण अमावसेला साजरा केला जातो या श्रावणी अमावसेला पिठोरी अमावस्या असे देखील म्हणतात. या पोळ्याच्या दिवशी श्रावण समाप्त होतो. वर्षभर शेतामध्ये काम करणाऱ्या बैलांप्रती प्रेम आणि जिव्हाळा व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. हा सण भारतामध्ये विविध भागामध्ये शेतकरी मोठ्या उत्साहात साजरे करतात. विशेषतः महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तेलंगणा या प्रदेशात बघायला भेटतो. ज्यांच्याकडे शेती नाही आणि बैल नाही ते या दिवशी मातीच्या बैलांची पूजा करतात.
पोळा कसा साजरा करता?
बैलपोळा हा दिवस बैलांच्या विश्रांतीचा दिवस असतो. या दिवशी बैलांकडून कुठल्याही प्रकारचे काम करून घेतले जात नाही, कारण हा बैलांच्या पूजेचा दिवस असतो. आजही भारतात हा सण शेतकरी पारंपारिक पद्धतीनेच साजरा करतात. सर्वप्रथम बैलांना नदीवर किंवा ओढ्यावरती नेऊन त्यांना स्वच्छ अंघोळ घातली जाते. त्यांना चारा पाणी दिले जाते. दिवसभर बैलांची सुंदर विविध रांगांमध्ये सजावट केली जाते. बैलांचे शिंगे रंगवली जातात त्यावर गेरूचे ठिपके दिले जातात. पाठीवरती झूल टाकली जाते. डोक्यावरती बाशिंग लावले जाते. नवीन वेसण, कासरा ( दोर ) लावला जातो. गळ्यात कवड्यांची माळ आणि घुंगरांच्या माळा घातल्या जातात त्यालाच घोगरमाळ देखील म्हणतात. पायात रंगीत तोडे घातले जातात. आपला बैल सगळ्यात सुंदर दिसावा यासाठी प्रत्येक शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे बैलाला सजवण्याचा प्रयत्न करतो.
सर्व सजावट झाल्यानंतर गावातील सर्व शेतकरी बैलांची मिरवणूक काढतात. बैलांना मारुतीच्या देवळात नेले जाते मंदिराला प्रदक्षिणा मारली जाते. सर्व बैल गावाच्या वेशीजवळ जमतात. तिथे सर्व बैलांना एकत्र उभे केले जाते आणि गावातील मुख्य व्यक्तीने इशारा करताच सर्व बैल अप – आपल्या घरी पळत सुटतात. त्यालाच ग्रामीण भागात पोळा फुटला असे म्हणतात. मग शेतकरी त्याच्या बैलांना घेऊन घरी निघतो. या दिवशी बैलाला नैवेद्य देण्यासाठी प्रत्येक घरामध्ये गृहिणी पुरणपोळीचा स्वयंपाक करतात. जेव्हा बैल त्यांच्या दारात जातो तेव्हा त्याची गंध लावून पूजा केली जाते. त्यांच्या वरून दिवा ओवाळला जातो आणि त्यांना गोड नैवेद्य पोटभरून खाण्यासाठी दिला जातो. अशाप्रकारे सुंदर पद्धतीने गावाकडे बैलपोळा आजही साजरा केला जातो.
बैलपोळ्याची कथा
एकदा शंकर आणि माता पार्वती कैलास पर्वतावर सारीपाट खेळत होते. या खेळामध्ये भगवान शंकर हरले. परंतु, भगवान शंकर म्हणतात डाव मीच जिंकला, यावरून महादेव आणि माता पार्वती त्यांच्यामध्ये वाद सुरु झाला. या खेळाला साक्षीदार महादेवाचे वाहन नांदी होता. माता पार्वतीने नंदीला खेळामध्ये कोण जिंकले असे विचारले. “सारीपाटाचा डाव शंकराने जिंकला” असे नांदीने सांगितले.
नंदीचे हे बोलणे ऐकून माता पार्वतीला नांदीच खूप राग आला. पार्वतीने नंदीला शाप दिला की “मृत्यू लोकात तुझ्या मानेवर जू ठेवून तुझ्याकडून काम करून घेतले जाईल”. नंदी खूप घाबरला आणि पार्वती मातेला शरण गेला. तेव्हा पार्वती मातेने नंदीला उ:शाप दिला “जो शेतकरी वर्षभर तुझ्या मानेवर जू ठेवील तो शेतकरी वर्षातून एकदा तुझ्याकडून काम करून न घेता तुला गोडधोड पदार्थ खाऊ घालून तुझी पूजा करील”. तेव्हापासून शेतकरी वर्षातून एकदा बैलपोळा साजरा करू लागला.
पिठोरी अमावस्या म्हणजे काय?
पिठोरी अमावस्या ही श्रावण महिन्यातील शवतच दिवस म्हणजेच पिठोरी अमावस्या. या दिवशी स्त्रिया पुत्रप्राप्तीसाठी, मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि घरातील सुख- शांतीसाठी व्रत करतात.
“पिठोरी” या शब्दाचा अर्थ आहे – “पिठ (पिठाने बनवलेले देवीचे रूप)”. या अमावसेला पिठापासून बनवलेल्या सप्तमातृका देवींची पूजा केली जाते.
पिठोरी अमावस्येची पौराणिक कथा
पौराणिक कथेनुसार एके काळी एका गरीब ब्राह्मण स्त्रीकडे अनेक मुले होती, पण दरवर्षी कोणते ना कोणते मुलं कुठल्यातरी कारणाने अपघाती किंवा आजाराने मृत होत असे. ती स्त्री खूप दुःखी होती त्यामुळे ती देवाकडे सतत मुलांसाठी प्रार्थना करत असे.
एके दिवशी एक मुनिवर तिच्या घरी आले आणि तिला विचारले, “तू इतकी दुःखी का आहेस?” त्यावर ती स्त्री म्हणाली, “माझी पोटची मुलं राहात नाहीत, दरवर्षी एखादं तरी मुलं मरण पावतं.” मुनिवर तिला म्हणाले, “तू कधी पिठोरी अमावस्या व्रत केलं आहेस का? तेव्हा मुनिवराने त्या स्त्रीला पिठोरी अमावसेच्या व्रताची संपूर्ण माहिती सांगितली.
हे व्रत करताना पिठापासून सप्तमातृका देवींची मूर्ती तयार करून त्यांची पूजा केली जाते, त्या मातृदेवतांच्या कृपेने तुझं घर आनंदाने भरून जाईल.” त्या स्त्रीने पुढच्या पिठोरी अमावास्येला संपूर्ण श्रद्धेने पिठाच्या देवी बनवून त्यांची पूजा केली, उपवास केला, कथा ऐकली आणि अन्नदान केलं. काही महिन्यांत तिच्या घरी पुन्हा पुत्र जन्माला आला आणि तो दीर्घायुषी ठरला.
हे देखील वाचा ;-
- राम नवमी कधी आहे आणि या राम नवमी ला जाणून घेऊया का प्रभू श्री रामांना मर्यादापुरुषोत्तम असे म्हणतात?
- दीप अमावस्या किंवा आषाढी अमावस्या साजरी करण्याची योग्य पद्धत
- श्री हनुमान जयंती / अंजनेय यांच्याबद्दल संपूर्ण माहिती
- गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमेबद्दल संपूर्ण माहिती व कथा
- भारतीय सिल्क साडी बद्दल संपूर्ण माहिती आणि प्रकार
- पैठणी साडी चे प्रकार, कलर आणि इतिहासाबद्दल संपूर्ण माहिती
- परंपरेचा ठेवा नऊवारी साडीचे प्रकार, इतिहास आणि संपूर्ण माहिती नक्की वाचा
- श्रीकृष्णजन्माष्टमीची कथा, माहिती, इतिहास